हुंदका साधा तुझा सांगून गेला
आसवांचा ओघही संपून गेला
द्वाड होता शब्द माझा बांधलेला
मोकळा केला तसा बोलून गेला!
कोणती ही रीत झाली वागण्याची?
भेटण्याची वेळ तो पाळून गेला!
का पहावी वाट फुलण्याची कळीने?
भृंग इच्छेने कुठे येऊन गेला?
" आज नाही", एवढेसे ती म्हणाली
तो नकाराने किती पोळून गेला !
भेटले मज लोक सारे टाळणारे ...
खेद हा की काळही सोडून गेला
-सोनाली जोशी
(पूर्वप्रकाशन- मराठी गझल. कॉम)
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा