वाटेत दगड माझ्या शेंदूर फासलेले,
झगडून मी जगाशी ईमान राखलेले...
नाही कुणीच येथे शब्दास जागणारे,
जगण्यासही अताशा वेठीस ठेवलेले...
नाहीच न्याय साधा हा कर्ण अर्जुनाला,
दुनियेस वीर वाटे मैदान मारलेले...
जो तो इथे तमाशा पाही बघ्याप्रमाणे,
गमजा उगाच भारी सारेच गोठलेले...
सारे लिहून झाले जे जे लिहायचे ते,
शब्दास धार माझ्या बोरू न तासलेले...
------------------------------नचिकेत भिंगार्डे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा