एका जत्रेत थोडयाशा गोंधळाने असंख्य लोक चिरडून मेले.
त्यानंतरची ही रचना...
जत्रा
निर्जीव देवतांच्या करतात येथ जत्रा
जातात जीव तरीही भरतात येथ जत्रा
ओझे परंपरांचे ठरतेय जीवघेणे
वेठीस बापुड्यांना धरतात येथ जत्रा
तो देव का दयाळू होई असा कठोर?
प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा
झाले ठिकाण जत्रा, चिंता आणि भयाचे
चिरडून सर्व श्रद्धा सरतात येथ जत्रा
आता पुढील वर्षी पुन्हा नवीन गर्दी
असले धडे कधी ना स्मरतात येथ जत्रा.
-अविनाश ओगले
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा