मान्यवरांची गझल-डॉ.राम पंडित

मीर क्षीरसागर - ⏱ १ मिनिट

कोठून ही  पहाटे अलवार साद आली
कोमेजल्या कळ्यांची अलगद फुले ग झाली


छेडून शब्द गेले ,जाणीव पाकळ्यांना
तरळून श्वास गेले,स्वप्ने दवात न्हाली


सुख थांब सांगताही ना थांबले ग दारी
घेऊन त्यास संगे ,आशा पहा निघाली


ऋतु संपले तनाचे कळले मलाच नाही
पण सांज सावल्यांना माझी व्यथा न भ्याली


शिवलेत ओठ माझे यंदाच या युगाने
जगता, तरी कथा ती गझलेत या निमाली


आला वसंत कैसा, शिशिरात या मनाच्या
सुखवाट आज जेव्हा, क्षितिजाकडे निघाली


 

गझल