गझल

गझल

जीवन तेंव्हा भिजत राहते

माझे दुखणे गझलांमधुनी निघत राहते
अश्रू होवुन जीवन तेंव्हा भिजत राहते

माणूस म्हणजे कधीच मजला कळला नाही
मनास माझ्या कोडे हल्ली छळत राहते

जखमांनाही किती वेदना होत असावी ?
थोडे थोडे दुखणे त्यांचे कळत राहते

मला हवे ते कधीच कोणा कळले नाही
नको नको ते मला सारखे मिळत राहते

नकोस

जीवन तेंव्हा भिजत राहते

माझे दुखणे गझलांमधुनी निघत राहते
अश्रू होवुन जीवन तेंव्हा भिजत राहते

माणूस म्हणजे कधीच मजला कळला नाही
मनास माझ्या कोडे हल्ली छळत राहते

जखमांनाही किती वेदना होत असावी ?
थोडे थोडे दुखणे त्यांचे कळत राहते

मला हवे ते कधीच कोणा कळले नाही
नको नको ते मला सारखे मिळत राहते

नकोस

जपलेली हळहळ

कातरवेळी दाटुन येते जुनाट मरगळ
जुन्या वहीतुन सुटतो जेव्हा तरणा दरवळ

पाकळीत त्या निरोप तर जिरला नाही ना?
पिकलेल्या काळजास लागे हिरवी कळकळ

मला वाटले सुकून गेले दव गालीचे
पाना पाना मधून आली कानी खळखळ

तुला मला जोडतो असा रस्ताही नाही
तरी बायको आज वाटली मजला अडगळ

किती बदलली घरे

माझी आई

संस्कारांची लावन करते माझी आई
देवांचे संगोपन करते माझी आई

दु:खाच्या डोहाला बाबा घाबरताना
जगण्याचे आंदोलन करते माझी आई

घरट्यावरती आभाळाचा होतो हमला
पदराचा गोवर्धन करते माझी आई

बाबांचे परगावी येणे जाणे अस ते
सावीत्रीचे चिंतन करते माझी आई

गाईला चारा अन बाळाना माया
तुळ शीला मग वंदन करते माझी

फुलपाखरे

नाचवू नका फुलपाखरे
राबवू नका फुलपाखरे

झोप साखरी त्यांची असे
जागवू नका फुलपाखरे

पंख कापरी तुटतील ते
गाजवू नका फुलपाखरे

राहू दे जिथे हसतील ती
थांबवू नका फुलपाखरे

विश्वबाग ही त्यांचीच ना
पाठवू नका फुलपाखरे

- हणमंत शिंदे

मी तुला अन तू मला मिरवायला हवे

सत्य आयुष्या अता पचवायला हवे
सख्य माझ्याशी तुला जमवायला हवे

ऊठ आता जाग तू निद्रिस्त भारता
स्वप्न मरणासन्न हे जगवायला हवे

चांदण्यांचे दागिने मोडीत काढुनी
मी तुला अन तू मला मिरवायला हवे

सांग का आहे पुरेसे भिंत पाडणे?
आपल्यामधले चिरे बुजवायला हवे

हे कसे कोठार?... होते सारखे रिते
खाद्य मेंदूला

असा कसा मोहरून गेलो....

असा कसा मोहरुन गेलो,तुला पहाता हरून गेलो
कधी न होतो जरी कुणाचा,तुझाच आता ठरून गेलो

न काहि येता कसे जगावे,इथेच सारे कळून गेले
जरी न पोहावयास येते,हरेक सागर तरून गेलो

नि:शब्द झालो सदैव तेव्हा,जशीजशी तू समोर आली
तुझेच गाणे म्हणावयाला,पुढे घसा खाकरून गेलो

समस्त दु:खे समग्र नाती,गरीब होतो धरून होतो

कधी वाटते मी भिडावे जगाशी

कधी वाटते मी भिडावे जगाशी

कधी वाटते मी भिडावे जगाशी, '' कशाला फुकाचेच ''? वाटे कधी
कधी मी निवडतो सरळसोट रस्ता,उगा फोडतो कैक फाटे कधी

कसेही जरी फेकले तेच नाणे,कधी छाप्,काटा कधी लाभतो
कशाला बसावे हिशेबास की,फायदे केवढे आणि घाटे कधी

कसे वाटते आज पाहूनि त्यांना,जिथे श्वान सामीष लाथाडतो
उभा

मी जसा आहे तसा..

वासनांना अंत नाही पण मनाला खंत नाही-
बेरडे वैराग्य येण्या कोरडा मी संत नाही..

मी जसा बाहेरुनी आहे तसा आतूनही मी..
तोतया पोशाख घेण्याएवढा श्रीमंत नाही!

जे मनाला वाटते, पटते तसे बोलून टाके,
अक्षरे तोलावया मी थोर प्रज्ञावंत नाही!

मुक्तछंदाचा कवी मी शब्द शब्दा जोडणारा,
उमलती आर्या रचाया पात्र, मोरोपंत

धुमसतो अद्याप माझ्या आत कोणी

टाळलेला आजही निष्णात कोणी
धुमसतो अद्याप माझ्या आत कोणी

माहिती होती जगाला गोष्ट सारी
बोलले नाही तरी जोरात कोणी

केवढा आहे महत्वाचा पहा मी..
सांडलेले रक्तही भरतात कोणी

का मला टाळून गेली ती दुकाने ?
[ वेदना भरतात का.. गल्ल्यात कोणी? ]

आपली ओळख असावी फार मोठी
एवढ्यानेही कवी होतात