जातांना नको बोलूस हळ्वे
शब्द नको शोधूस हळ्वे.
वळनार नाही जीभ माझी
प्रश्न नको करुस हळ्वे.
नेतील तुला दुखाच्या दारी
माग नको शोधूस हळ्वे.
फुटेल ह्या तनामनास टाहो
स्पर्श नको करुस हळ्वे.
आधीच डोळे डबडबलेले
वळूनी नको पाहूस ह्ळ्वे
------ किरण
विचाराधीन
तांत्रिकदृष्ट्या निर्दोष नसलेल्या गझला इथे हलविण्यात येतील.
जातांना नको बोलूस हळ्वे
नभी चान्दण्यांची जरी आरास आहे
नभी चान्दण्यांची जरी आरास आहे
अंधार कोठडीचा मज कारावास आहे.
तू उधळ तुझ्या चंद्रकला आकाशी
मज लागले ग्रहण खग्रास आहे.
कुन्या सैताना ने मुडदे पाडले
अन साधुच्या गळ्यात फास आहे.
अशी सुरू आहे वाटचाल जीवनाची
जनू मरना नंतरचा प्रवास आहे.
ना पायात फास ना पिंजर्यास ताला
किती पारध्याचा पक्ष्यावर
गझल
मैफिल
नि:शब्द स्तब्ध सृष्टि
निश्प्राण गार वारा
डोहामध्ये तमाच्या
व्याकूळसा इशारा
पटलावरी नभाच्या
हे मोजकेच तारे
लावून प्राचिला डोळे
आशेचे मृतक धुमारे
प्राक्तनास माझिया या
हा छंद अघोरी जडला
संदिग्ध क्षितिजावरति
एक तारा अवचित गळ्ला
या अवघड वळणावरती
वळवाची सर कोसळते
ही आज अवेळी कोकिळ
कां मालकंस आळविते
मी दोष कुणाला
निश्चय
मंद वारा कधी इथे वळलाच नाही
दीप आशेचा कधीही जळलाच नाही
घेतले ते चुंबन की होता एक चावा
तो आजही कावा तुझा कळलाच नाही
सिद्ध झालो उपदेशाला येथ भूवरी
कोणी एक लाल आज चळलाच नाही
रूक्ष होते जीवन, दाह वैशाखापरी
पापणीतुन अश्रुही गळलाच नाही
नित्य आशा जयाची नेई क्षितीजावरी
पराजय
मी.. माझ्यातला...
देतात दगा हे शब्द नेहमी मला
ना सांगू शकलो कधि काहिच मी मला
बोलु काय माझ्याबद्दल येथे मी
ना कधी पाहिले आरशात मी मला
तुला पाहुनी तोल सुटे जगताचा
कसा आवरू सांग इथे मी मला
होतो मीही गर्दीत उभा त्या वेळी
ना ओळखले पण त्या क्षणीच मी मला
दोन श्वासात
दोन श्वासात बीजाला कधी कोम्ब येत नाही
पापणीत अश्रु दाटे त्याचे दव होत नाही
ओठ गाली चुम्बीतात फिरे बटेतून हात
घेतले नुसते मिठीत त्याने प्रेम होत नाही
सूर्य अस्तास पावतो चन्द्र रात जागवितो
चन्द्र नसता चान्दणे तेथे भय येत नाही
गात आहे कोकिला ती प्रेमे वसन्त ऋतूत
रंग काळा प्रकटला
घेउ तो श्याम आज सांगाती
तोडली रीत, सोडली नाती,
धार केली, चकाकली पाती
झाकती जात देवुनी नारे,
वीरगाथा खरीखुरी कीती?
माजला सांड, मालका मारी,
त्यास पाळा, ति कोणती नीती?
या धरा फेर, साथ द्या आता,
काळ आला! कुणास माहीती?
आळशी का कधी व्यथा जाणे?
लाथ घाला! मशाल घ्या हाती
मी पुढारी कशास होऊ सांगा!
घेउ तो श्याम आज सांगाती
-निलेश सकपाळ
०३ मार्च २००८
पण आज अचानक कळले...
जो मार्ग निवडला होता, वाटले फुलांचा रस्ता
पण आज अचानक कळले, काट्यांनी भरला होता...
हास्यात हुंदक्यांना मी आवरून गेलो
पण एक अनावर हुंदका केव्हाच निसटला होता...
मी शोधत होतो माझे चांदणे गौर पुनवेचे
अन सभोवती अवसेचा काळोख दाटला होता...
मी समजत होतो आता डाव हा जिंकलो आहे
एकच प्रश्न....
फलाटावर नादे बोलकी शांतता
रूळावरून गाडी कुठे गेली ?
निःशब्द लेखणी पोरकी पुस्तके
भरलेली वही कुठे गेली ?
उडाला कधीच नशिबाचा राघू
पिंज-याची कडी कुठे गेली ?
लपून बसण्या अ।भाळ पुरेना
अभंगांची ताटी कुठे गेली ?
करतो साजरा असण्याचा सोहळा
जगण्याची हातोटी कुठे गेली ?
-वहाटूळ