मान्यवरांची गझल

मान्यवरांची गझल

शंकर रामाणींची गझल

कविवर्य शंकर रामाणींची गझल ( 'दर्पणीचे दीप ' या काव्यसंग्रहातून)

अजुनी भुऱ्या दिशांचे मी हुंगतो किनारे
आयुष्य लासणारे मी पोसले निखारे

केली कुणी कळेना असली कठोर शिक्षा
प्रारब्ध राजबंदी; चौकीवरी पहारे..

ज्या लाविल्या कुणी त्या विझल्या अता मशाली;
बेभान नादती का दूरातले निखारे

माझ्यातली पुराणी उध्वस्त धर्मशाळा;
आरण्य आठवांचे दगडी

अंदाज : डॉ. श्रीकृष्ण राऊत

चिखलात खोल फसले सगळेच पाय आता;
मातीस सापडेना काही उपाय आता.

सौंदर्य आपले ती सांभाळते असे की,
नाहीच लेकराला पाजीत माय आता!

टपलेत भोवताली चारीकडून बोके;
सांगा कुण्या खुबीने वाचेल साय आता?

वात्सल्य कोणते हे आहे मला कळेना;
ही वासरास खाते दररोज गाय आता.

आक्रोश उंच जाता आकाश कंप पावे;
अंदाज येत नाही होईल काय आता.

********************************************
http://mazigazalmarathi.blogspot.com
********************************************

वनवास : डॉ.श्रीकृष्ण राऊत



कमी झाला झमेल्यांचा जिवाला त्रास थोडासा;
घडीभर लाभला जेव्हा तुझा सहवास थोडासा.


दिवसभर रोज मरताना तुला येईल तो कामी;
सकाळी ठेव जगण्याचा मनी उल्हास थोडासा.

पुन्हा झाली चुकी माझी, पुन्हा मी फसवल्या गेलो;
पुन्हा झाला जिव्हाळ्याचा मला आभास थोडासा.


कुणाला शोधते भिरभिर नजर ओली असोशीने;
कुणाची वाट पाहे हा अखेरी

दारू - प्रसाद कुलकर्णी


देऊनही  मला  ही  देणार  काय  दारू ?
मस्तीत  मीच  माझ्या  चढणार  काय  दारू ?

फेकून  देत  प्याला  मी  हा  विचार  केला
काळीज  फाटलेले  शिवणार  काय  दारू ?

बेतास  बात  सारे  जगणे  जगून  झाले
जगण्यात  झिंग  नाही , करणार  काय  दारू ?

ज्यांनी  निदर्शनांनी  दारूच  बंद  केली
ते  शेवटी  म्हणाले  घेणार   काय 

कुठलेच स्वप्न आता - डी. एन. गांगण

कुठलेच स्वप्न आता माझ्या उशास नाही
कुठलाच गंध उरला सुकल्या फुलास नाही

तो चेहरा कुणाचा मी आठवू कशाला?
कुठलीच आस आता या आरशास नाही

खुणवीत रोज होते खोटे तुझे दिलासे
फितवून मी मनाला केला प्रवास नाही

बहुतेक माणसांची चाहूल ही असावी
रानात वनचरे ही का आसपास नाही

या ऐस-पैस मोठ्या

मुंबई - इलाही जमादार

वरून दिसते आम्रतरूसम मोहरली मुंबई
हाय! परंतू ऋतू जाणतो पोखरली मुंबई

 

पोटासाठी अनाथ अगतिक आला आश्रयाला
निवार्‍यास अंथरली त्याने पांघरली मुंबई

 

लहान होती अल्लड होती एके काळी तीहि
अशी बहकली कुणीच नाही सावरली मुंबई

 

जशी केतकी बनात चाले सत्ता भुजंगांची
तशी अवस्था बघून इथली घाबरली मुंबई

 

ए. के. शेख यांची गझल...

घाईमध्ये जीवन सरले... पाहू आता पुढल्या जन्मी
करणे जे ते, सारे उरले... पाहू आता पुढल्या जन्मी

आयुष्यच हे उधळुन दिधले प्रिय सखीवर माझे तरिही
प्रेम सखीला नाही कळले... पाहू आता पुढल्या जन्मी

नोकर-चाकर.. गाडी-माडी.. श्रीमंती.. अधिकार नि सत्ता
स्वप्नं न ते सत्यात उतरले.. पाहू आता पुढल्या जन्मी

कर्जामध्ये जीवन सरले

कशी वेळ आली? : डॉ. श्रीकृष्ण राऊत

कशी वेळ आली?
क्षमा क्रूर झाली!


हसे आज कुंकू;
गमावून लाली.


करा बंद वर्षा;
पिके तर जळाली.


बगीच्यात प्रेते
फुलांची मिळाली.


बघा ही गटारे;
सुगंधात न्हाली.


खुनी देव झाले;
पुजारी मवाली!


(`गुलाल आणि इतर गझला'संग्रहातून)


भेटा : http://www.mazigazalmarathi.blogspot.com

दीनांच्या चाकरीसाठी : लोकशाहीर वामनदादा कर्डक

भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे
दीनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे.

उपाशी जीव हे कोटी तयांची भूक भागावी
अशासाठी तुझ्याकडचे भीमाचे ज्ञान मागावे.

निवारा ना कुठे थारा अशांच्या आसऱ्‍यासाठी
मनाच्या मंदिरी थोडे तयांना स्थान मागावे.

भूमी ती भीमरायाची तुझ्या हाती अता आली,
मलाही पेरणीसाठी जरासे रान मागावे.

तुझी निष्ठा

मला वाचवा: घनःश्याम धेंडे


"मला वाचवा, मला वाचवा" मरण बोलले
"बसू लागले चटके मजला" सरण बोलले


स्थलांतराचे दु:ख काय ते मला विचारा
"मी ही आहे ग्रस्त खरे तर" धरण बोलले


टिकून आहे उमेद माझी चालायाची
"थकून गेली वाटच पण ही" चरण बोलले


झुणका-भाकर, कांदा, ठेचा कुठवर खाऊ
"बासमतीचा भात कुणी द्या" वरण बोलले


तळे