मान्यवरांची गझल

मान्यवरांची गझल

मा.शंकर वैद्यांची गझल

काव्य संग्रहः दर्शन

मी खिन्न गीत गाता त्या कोण रोधिताहे?
आता मना कळे की आनंद येत आहे

मी व्यर्थ या विराण्या छेडीत,गात आलो
चित्तातल्या झर्‍याचा  उलटा स्वभाव आहे

या कातळामधूनी, गर्भातूनी मनाच्या
आनंद अमृताचा वर्षाव होत आहे

सृष्टीच मोर झाली, उत्फुल्ल हे पिसारे
डोळे मिटून घेणे हे पाप होत आहे

फोटो : डॉ.श्रीकृष्ण राऊत


ना झोपतो, ना जागतो, मी वागतो वेड्यापरी;
तंद्रीत एका वेगळ्या मी राहतो वेड्यापरी.


सत्यात अन् स्वप्नातही झाल्या किती भेटी तुझ्या;
रात्रंदिनी बोटावरी मी मोजतो वेड्यापरी.


वेणीत जी तू खोवली  होती गुलाबाची फुले;
एकेक त्यांच्या पाकळ्या सांभाळतो वेड्यापरी.

नाते मला लागे पुसू,  "आहेस माझी कोण तू?"
प्रश्नास ह्या साध्यासुध्या मी हासतो

वरात : डॉ. श्रीकृष्ण राऊत

तसा न चंद्र राहिला, तशी न रात राहिली;
अजूनही तशीच तू तनामनात राहिली.


अजून आठवे मला सुरेख तीळ सावळा;
अमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली.


शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे;
मधुर चोरटी मिठी तुझी स्वरात राहिली.


कधी कधी हवेत ह्या तुझाच स्पर्श जाणवे;
फिरून सावली तुझी जशी

घनश्याम धेंडेंची गझल

कुणी गायिली असेल पण मी गझल पाहिली आहे
लाखोंमधुनी मला हेरुनी हाक बाहिली आहे

ओलेतीची कवी-कल्पना असेल त्यांच्यासाठी
धुवांधार पावसात माझ्यासवे नाहिली आहे

बोलत असते माझ्याशी ती फूलपाखरी भाषा
महाल बांधुन दवबिंदूचा त्यात राहिली आहे

हात लावुनी पहा हवे तर, कशास खोटे बोलू
शब्दांशब्दांमधून माझ्या कशी काहिली आहे

जन्मावस्था ही

समर्पण : डॉ. श्रीकृष्ण राऊत



समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते;
मीपण अवघे किंमत भारी प्रेम मागते.

 

झोप सुखाची, चैन जिवाची, खुशी मनाची;
अशी आपली दौलत सारी प्रेम मागते.

 

आनंदाचे देणे-घेणे करते नगदी;
आठवणींची किती उधारी प्रेम मागते!

 

कधी रातच्या विलायचीला नाही म्हणते;
कधी दुपारी पान सुपारी प्रेम मागते.

 

शेजेवरती सांगे ताबा

पहारा : डॉ. श्रीकृष्ण राऊत


तुला पाहिजे तसे वाग तू ;
भल्या बुऱ्याला लाव आग तू.

उगाच खोटी भीड कशाला ;
हक्क आपला तिला माग तू.

कुठे अचानक गायब झाले ;
त्या सत्याचा काढ माग तू.

जमेल जेथे मैत्र जिवाचे ;
तिथे फुलांची लाव बाग तू.

मनात नाही त्याच्या काही ;
नकोस त्याचा धरू राग

विचारीन पांढर्‍या छडीला...

विचारीन पांढर्‍या छडीला...


ती स्वप्नाळु भिरभिरणारी नजर सापडेना
विचारीन पांढर्‍या छडीला अगर सापडेना

प्राक्तनामधे लिहिले नियतीने जे जे ते
खोडुन काढिल असा एकही रबर सापडेना


पुस्तकापरी येता-जाता मला चाळती
घालायाला परी कुणाला कव्हर सापडेना

दाखवायचे कुठुन मुलांनी विचारले तर
गोष्टीमधले आटपाट ते नगर सापडेना


शब्द विखारी असा बोलते गोड वैखरी

तो बहिर्‍यांची जमवुन मैफल...


तो बहिर्‍यांची जमवुन मैफल, दाद लाटतो आहे
अंधाच्या वस्तीत आरसे व्यर्थ वाटतो आहे

मावळतो ना धर्मच! तेथे मी पहाटतो आहे
कुणास प्रेषित, ख्रिस्त, महंमद, बुध्द वाटतो आहे

बह्मांडाचे बोनसाय मी करीन शंका नाही
नित नेमाने मी नजरेने क्षितिज छाटतो आहे

गावकुसावर बरसलाच ना श्रावण औंदालाही
इथेच येवुन कसा नेमका मेघ

मलूल पडलेले जेव्हा गुलदान पाहतो हृदयाचे

मलूल पडलेले जेव्हा गुलदान पाहतो हृदयाचे
शिंपडतो मी त्यांच्यावरती थेंब तुझ्या आवाजाचे

द्वैताच्या सीमेपाशी प्रार्थना अशी आली मोठी
तुझा चेहरा आठवला, आभार मानले देवाचे

दुनियादारी ओलांडुन मी खूप दूर आलो आहे
नाहीतर सांगितले असते चरित्र एकाएकाचे

दुःखाविषयी कसे छानसे बोलावे ते कळते, पण
समजत नाही कसे पुसावे अश्रू एकामेकाचे

छान जरी

नको नको त्या शंका मजला शहर विचारत होते

नको नको त्या शंका मजला शहर विचारत होते
खुले खुले रस्ते होते पण धक्के लागत होते

उगाच का दवबिंदू सगळे खिन्न थरारत होते !
कुठेतरी डोळ्यात रात्रभर अश्रू जागत होते

आधी केला जप्त चेहरा माझा त्याने, नंतर
शहर माझियापाशी माझी ओळख मागत होते

कुणीतरी बाहेर असे जे धीर देउनी गेले
कुणीतरी