तरही गझल

तरही गझल

..उशीर

(भुषण कटककर यांनी दिलेल्या मिसर्‍यावर केलेली ही गझल. वृत्ताच्या सोयीसाठी मिसर्‍यात थोडासा बदल केला आहे.)

========================
उशीर  झाल्याक्षणी  कळाले, 'उशीर  झालेला  आहे'
उशीर  हा  नेहमी  असा  'वक्तशीर'  झालेला आहे..!

कधी  तुझे  पावसाप्रमाणे  निघून  येणे  घडायचे?
इथे  कुणी  चातकाप्रमाणे  अधीर  झालेला  आहे...

"मिळेचना  नोंद  कोणतीही" म्हणे  तुझी  आमच्याकडे,
किती  पहा  देव  आमचा 

रोजचेच.. (तरही गझल)

(कौतुक शिरोडकरांच्या 'रोजचेच..' या गझलेवरून सुचलेले हे काही  शेर. एवढ्या लहान वृत्तात लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे चूभूद्याघ्या.)

==========
गिरवतोय  रोजचेच
नाद  तेच, वाद  तेच..

रोज 'आजचे  भविष्य'
हाय! कालसारखेच..

भेटलो  किती  दिसात,
हासलो  किती  बळेच..

का  विचारशी  उगीच,
ही  दशा  तुझ्यामुळेच !

सत्य  बोलतो  खुशाल
संपलेत  डावपेच.

काळजी  करू  नकोस;
'सोडली'  तुझ्यासवेच..

गे, तुला 

शिंतोडा

चादर नाही, छप्पर डोक्यावर नाही
या रस्त्यांवर स्वप्नांचा वावर नाही काल नफ्याने भिजले जे; या तोट्याचा -
शिंतोडाही त्यांच्या अंगावर नाही? मंदी, युद्ध... तुम्हाला विषय चघळण्याचे
पोट तुम्हा लोकांचे हातावर नाही रोजच पाणी देतो रोपांना, आता -
फार भरवसा या आभाळावर नाही! सत्य हरवले छाया-पडछायांमध्ये
सूर्य कुणाचाही का माथ्यावर नाही

तरही गझल- कसे सावरावे

ॠतू वाहणारे किती मी सहावे
तुझे चंद्र आता कसे सावरावे ।[ही ़ किरण येले यांची गझल आहे.त्यावरील तरही गझल.]

तुझ्यावीण येथे कसे मी रहावे
तुझे चंद्र आता कसे सावरावे?

सख्या सांग झाला गुन्हा कोणता रे
तुझे मौन आता कसे साहवावे?

तुझे श्वास नसता इथे आस-पास
दिव्याने असे वांझ  का फडफडावे ।

राहिले रे अजून श्वास किती ?*

* राहिले रे अजून श्वास किती ?
जीवनाची कथा उदास किती

दूर गेलीस तू.. निघून जरी...
दरवळे गंध... आसपास किती

चौकटीचे कुठे असे.. जगणे...
जीवनाला परीघ्-व्यास किती

गंध गेला... उडून पार जरी...
मी जपावे जुन्या फुलास किती ?

ऐकतो... पाहुण्यांस मान इथे
बंद दारेच स्वागतास किती !

सूर माझ्यामधून... दूर अता